मुंबई – अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला धक्का दिला आहे. मधुकर पिचड समर्थकांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे, विधानसभा निवडणुकीपूर्वी वैभव पिचड आणि मधुकर पिचड यांनी भाजपात प्रवेश केला होता, त्यावेळी या कार्यकर्त्यांनीही भाजपात प्रवेश घेतला, परंतु आता पुन्हा या कार्यकर्त्यांनी घरवापसी केली आहे. यावेळी बोलतना जयंत पाटील यांनी हा तुमच्या आयुष्यातील शेवटचा पक्ष हे ध्यानात ठेवा असा सूचक दमच भरला.
0 Comments